रताळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

रताळ हे प्रामुख्याने केवळ उपावसाच्या दिवसात खाल्ले जाते.


खरंतर त्यातील पोषकघटक स्वास्थ्य सुधारण्या सोबतच वजन घटवण्यासही फायदेशीर आहे.


रतळयात फॅट नाही, कोलोस्ट्रोल नाही आणि पचायलाही हलकी आहेत.


रताळ हे कंदमूळ भरपूर स्टार्चने युक्त असून शरीराला ताबडतोड उर्जा देण्याचं काम करतं. रताळयाचा गर पाढंरा पिवळट रंगाचा असतो तर काही रताळी आतून केशरी रंगाची असतात.



नैसर्गिकरित्या गोड असतेः


रताळ नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कैलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. हेल्दीफाय मी च्या मते, एका मध्यम आकाराच्या रताळयामधून सुमारे ३० कैलरीज मिळतात. तुमची गोड खाण्याची इच्छापूर्ण करायची असल्यास रताळयाचं कस्टर्ड हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे कमरेचा वाढता घेर आटोक्यात राहण्यास मदत होते. सोबतच रताळयामध्ये जीवनसत्त्व अ मुबलक आढळते.


परिणामी रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.


फायबरने परिपूर्णः


रताळयामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असल्याने वेळीअवेळी लागणा-या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. फायबरमुळे रताळं खाल्ल्यानंतर खूप वेळ पोट भरलेले राहते तसेच भूकेवरही नियंत्रण मिळवता येते. एका मध्यम आकाराच्या रताळयामध्ये सुमारे चार ग्राम फायबर असते. म्हणूनच उपवासाच्या दिवसा व्यतिरिक्त ही ऐरवी ही रताळयाचा आहारात समावेश असावा.



रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहतेः


रताळयामध्ये कार्ब्सचे प्रमाण अधिक असले तरीही त्यामधून शरीराला adiponectin नामक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणा-या हार्मोन्सला चालना देण्याचे काम करते. असे Cochrane Database of systematic Reviews जर्नलचे मत आहे. रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण, मिळवता येते, रताळयामध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर झटकन वाढत नाही. त्यामुळे तळण्याऐ ठाजी, भाजण्याऐवजी रताळं वाफवून आहारात घ्यावे.